भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर (Border Gavaskar Trophy) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना दोघांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत असून, आता निवृत्ती पत्करावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. रोहित शर्मा निवृत्ती घेणार हे आता जवळपास निश्चितच झाल्यासारखं दिसत आहे. पण विराट कोहलीच्या बाबतीत अद्याप स्पष्टता नाही आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अतुल वसन यांनी बीसीसीयआला दोन्ही फलंदाज संघर्ष करत असताना त्यांचा एक्झिट प्लॅन तयार ठेवावा असा सल्ला दिला आहे.
36 वर्षीय विराट कोहली मागील अनेक काळापासून मैदानावर संघर्ष करताना दिसत आहे. त्याने आधीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, कसोटी करिअरही शेवटच्या टप्प्यावर दिसत आहे. दरम्यान अतुल वसन यांनी विराट कोहली सध्या संघाभोवती असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करताना विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन आणि वारसदार यांच्याबाबत प्लॅन तयार ठेवावा असा सल्ला दिला आहे.
Leave a Reply